Friday, October 26, 2007

कुसुमाग्रजाच्या कविता ---- अनुवाद करतांना --मराठी आलेख

कुसुमाग्रजाच्या 108 कवितांचा अनुवाद पहा याच ब्लॉगवर
माणसाकडे संधी येते आणि खूप उशीरा कळत की आपल्या हातून त्या संधीच चीच करण्याच राहून गेल.
नाशिकला माझ पोस्टिंग झाल्यानंतर लगेचच मी तात्यासाहेबांना भेटायची संधी घेतली. ते फार मोठे कवि आहेत. त्यांनी कांही नाटक पण लिहिलीत (विशेषतः नटसम्राट), त्यांचे लेख व त्यांच्यावर लेख र्तिमानपत्रांत येतात, पण त्यामधे त्यांचे स्वभाषेवरील विचार, शासकीय अनुदाने बक्षीसे, इत्यादि बाबत मते, एवढेच वाचले होते. ते फार अबोल आहेत, व त्यांचे कांही खास मित्र सोडले तर एखी संकोची आहेत अशीही समजूत होती. मस्त कवितेबद्दल ची रसिकता आहे पण जे कांही वाचन झालेल ते बहुतांशी हिंदीतून। त्यांच्या कविता वाचून काढून मग त्यांच्याकडे जाव अस कांही सुचल नाही. त्यामुळे ज्या साहित्य प्रांतात ते एवढे मोठे, त्याबद्दल आपण कांय बोलणार अशी एक शंका मनात होतीच. त्यांची नितांत सुंदर प्रार्थना सर्वात्मका सर्वेश्र्वरा शाळेत म्हणायची नाही बगैरे बादही तेंव्हा चालू होते. K चर्चा झाली ती आजच्या समाज-मूल्यांवर. देशांतील नागरिकांची जागरूकता आणि प्रबुद्धता कशी बाढवावी, कशी टिकवावी इत्यादि मुद्यांवर. पण ती छोटीशीच चर्चा होती.
त्यानंतर जळगांव स्कॅण्डल च्या निमिताने व नंतरही माझे लेख अधून मधून प्रसिद्ध व्हायचे त्यावेळी कुढून तरी ऐकायला मिळायचे की तात्यासाहेबांना तुमचे लेख आवडतात. पण ही 'सांगोवांगी' वार्ता म्हणून मी कांही मनावर घेजल नाही.
पुढे त्यांच्या भेटी अधून मधून होत राहिल्या. मधे मी केलल्या एका बंगाली कवितेचा मराठी अनुवाद त्यांना आवडला अस ते म्हणाले. माझ्या आवडीच्या कांही हिन्दी कविता त्यांना ऐकवल्या. मी मधून मधून हिंदीतही लिहिते हे ही सांगून झाल. पण त्यांच्या कविता हिंदीत अनुवादित कराव्या अस कांही वाटल नाही. तेवढी माझी प्रतिभा किंवा तयारी नाही याची जाणीव होती. बहुधा झााल्याही असतील अशी मी समजूत करून घेतली.
आता ते नाहीत. त्यांच्यावर भरभरून येणारे लेख वाचतांना त्यांच्या कविता पुन्हा दृष्टीस पडल्या आणि वाटल, आपण इथे दिल्लीत ! या कवितांची कुणाबरोबर चर्चा करायची तर ती माणस k हिंदीभाषी ! तरी मी कवितांचा गद्य अनुवाद पुष्कळांना ऐकवित होते, आणि वाटल- हे कविवेही लिहून काढण जमेल आपल्याला. त्यांच्या गाजलेल्या दोन ओळी-
'समिधाच सखे या, त्यांत कसा ओलावा,
तव आंतर अग्नि चेते यही प्रयोजन'
मूळ कडव मोठ आहे हे कळल्यानंतर त्यांत भर घातली.

समिधा
समिधा सखे यह करे स्नेह क्यो सिंचन
क्यों पुष्पों के मिस दे मधुपान-निमंत्रण
रूक्षता नियति है लिख दी मैंने इनकी
तब आंतर अग्नि चेते यही प्रयोजन !

त्यांच्या कांही कविता अगदी सोप्या असूनही त्यांत एक उत्करता आहे।

कविता मेरी
कविता मेरी विजय के लिये कभी न थी
इसीलिए ना चिंता इसे पराजय की
नही जन्म के लिये कभी भी रूठी थी
इसी लिये वह पडी मौन पर भारी थी।

अशाच त्यांच्या दोन छोटया कवितांचा (जीवन लहरी) छान अनुवाद झाला-

सार्थक
माटीके चित्रोंको दिया तूने नाम पता
माटीके चित्रोंको दी भाव-विभोरता
हृदय तेरे सार्थकता प्रगटी जब ऐसे
माटीके चित्रोंने, देव! दिये अश्रु तुझे.

दुसरी मधे वर मागितला आहे-

धर्म
दे मन को निर्भयता, अंतर को भाव-सृजन
प्रज्ञा का दीप जल उज्जवल हो ये जीवन
जुल्म, पाप से बैर, विफलता में अचल धीर
मानवता बनी रहे परम-धर्म-संहिता.

कळीच्या हक्काबद्दल ही कविता-

कली का हक
हर कली को जन्मसिद्ध हक है, चटखने का
माटी से मिली विरासत को गगन पटल पर लिखने का
खिले शाही उद्यानों में, या मरूभूमि में उजाड
पर हर कली को हक है फूल बनकर खिलने का
हो गुलाब या कमल कली हो, या नाली पर खिली कली
बाट जोहता होता उसकी प्रकाश कण एक सूरज का
हर कली में जिवन्त है, दृढ निश्चय पुष्पित होने का
नखरे नाज दिखाने का और सुगंध बरसाने का

रडगाणी सोडून द्या अस सांगणारी त्यांची एक कविता आहे, आदेश, तिचा हा अनुवाद

आदेश
आओ बैठें,
रोना तो लगा है रोज ही,
पर आज तो
थोडा हंसे।
अंधेरे का कीर्तन
भूल जाये थोडी देर
हृदय पर लगा लें
उजाले के छापे।
तेरे मेरे जीने के
परस्पर जो स्वामी
उन विश्र्वेश्र्वर सूर्य के
आदेश हैं ऐसे।

अर्जुनाला गीता सांगतांना कृष्णाने निर्गुणाची महती गाऊन सगुणदूजकाला मूढ असे म्हटले त्यावर तात्यासाहेबांना केलेल्या कवितेचा हा अनुवाद-

आलंबन
चलो मान लिया,
जब स्वयं श्रीकृष्ण ने कहा-
'जो देखे मानव रूप में'
मुझे, वह मूढ है'
भगवन्, उन मूढों की सूची में
मेरा भी नाम है।
तुम निर्गुण तुम निराकार,
विश्र्वात्मक तुम
अरूप अपार,
जाने मेरी प्रज्ञा जाने,
मन ना माने,
मुझे चाहिये रूप तुम्हारी
सगुण साकार,
जो इन नयनों को दे पहचान
दुर्बलताको धीरज बांधे
मन को दे जो आशास्थान
विश्र्व की इस असीमता में
मेरा जो एकाकीपन
रूप तुम्हारा बना रहे
मेरा आलंबन.
हाँ मूढों की सूची में
नाम मेरा भी है
और साथ एक सांत्वन
जिस अर्जुन के लिये
सुनाई गीता तुमने
सूची में है उस अर्जुन का
अग्रक्रम !

ध्येयासक्ति बाळगणारी माणस ही तात्यासाहेवांचे लाडके हिरो असत. सुखवस्तू माणसाला हा ध्येयवेडेपणा कसा कळणार? अशी एक छानशी अनुवादित कविता आहे 'क्यों'-

क्यों
छोडकर राजगृह क्यों, गौतम वनवास करे?
अपना ही क्रॉस क्यों येशू पीठ पर धरे?
सुकरात भी क्यों विषभरा प्याला लगाये होंठ से?
तत्व च्युत होना नही है, मौत तू लग जा गले!
भूमि धन से विरत कोलंबस चले सागरे के द्वार
उत्तरी ध्रुव की वरफ में खोज कोई क्यों करे?
घास की हो रोटी, सोने को शिलाएँ हों कठिन,
क्यों महाराणा प्रतापी जंगलों में ही फिरे?
पानीपत में हार जब निश्च्िात मराठों की हुई
सदाशिव को छोड जनकोजी न क्यों भागे चले?
रोग संकट कोई ओढे कुष्टरोगी के लिये क्यों?
कोई सरहद पर हिमालय को बचाने क्यो लडे?
करो समझौता सुखों से, रहो घर में चैन से
मंत्र यह जाने न जो, क्यों चतुर उसको हम कहें?
न्यूटन ने म्हटल होत की ज्ञानाचा सागर
अफाट आहे, त्यांत मी वेचतो ते निवळ
वाळू-कणांइतके छोटेसे ज्ञान भांडार आहे.

कुसुमाग्रजांनी देखीळ अफाट, असीम विश्र्वांत माणसाचे छोटे से स्थान या दोन कवितेत मांडून ठेवले आहे-

रहिवासी
रहिवासी तो हैं ही हम
मली मुहल्ले, गांव के,
और अपने प्रांत के,
और अपने देश के।
लेकिन यह याद रहे
कि रहिवासी भी है हम
सौर मंडल में,
पृथ्वी नामक ग्रह के।
और वह ग्रह भी जहाँ बालू कण जैसा
क्षुद्र
उस असीमित विश्र्व के।

दुसरी कविता थेंब अशी आहे-

ओसकण
अनंतताका गहन सरोवर
मंझधारे में विश्र्वकमल है,
खिला सनातन।
कमल पंखुडी पर
पडा हुआ है,
एक ओस-कण।
उसके झिलमिल कंपन को
हम धरती के वासी मानव,
कहते जीवन !

पक्षी या त्यांच्या प्रिय रूपकावर ही कनिता --
आज दोपहर
यह पंछी तो, बैठा मेरे सम्मुख था, आज सकारे।
उषःकाल के नभ का टुकडा, उतर पडा था मेरे द्वारे।
अगम शक्ति ने, दान दिये जो, आंचल मेरे।
एक कौतुक तो उनमें से यह पंछी भी था।
पर कौन शिकारी, आज दोपहर,
क्रूर कर्म कर गुजर गया था।
विद्ध-शर-छाती लिये यह,
मृतक पडा था।

लो आया किनारा
तट पे है गूँजा नाविकों का इशारा
लो आया किनारा।
उन्मत्त तूफानी सागर विकराल
उतारी थी नौका, ताने थे पाल,
किया अनसुना भीरुओंका पुकारा,
लो आया किनारा।
वो संग्राम अब पूर्ण होने चला,
युगों की तपस्या की है सिद्धता,
वीरोंके श्रमने है जिसको निखारा
लो आया किनारा।
तट पे हैं झिलमिल पंक्तियाँ दीप की,
शलाका लाल पीली या नीलाभ की,
तमपे है खिलता जैसे अंगारा
लो आया किनारा।
इस एक क्षण की थी की हमने आस
इसीसे हुआ सिद्ध नौका प्रवास,
आये हैं वापस जग जीत सारा,
लो आया किनारा।
जो बिछडे हैं संगी उनको प्रणाम,
उनकी स्मृति रह न जाए अनाम
जयध्वज चढाओ तट पर हमारा
लो आया किनारा।

या सर्व कविता वर्तमानपक्षांतून आलेल्या लेखांमधे ऊद्धृत केल्या होत्या. सुमारे सात-आठ दिवसांनी हे लिखाण थांबले. पण मला हा ध्यास लागल्यासारखा झाला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन व मंडळ अशा दोन्हीं वाचनालयांमधून त्यांचे कवितासंग्रह आणून वाचत गेले, तेंव्हा खरा त्यांच्या अति विस्तीर्ण कॅनव्हासचा बोध झाला. पुढील जवळ-जवळ तीन महिने मी सपाटा लावून खूपशा कनितांचा अनुवाद केला -- कित्येकांना ऐकवल्या त् हिंदी-भषी होते तसे बरेच मराठी भाषीही होते.मग मासिकांमधूनही चार-सहा अशा येेत गेल्या. एका मल्याळी व्यक्तिने मल्याळीत त्यांतल्या काहींचे मल्याळी अनुवादकरत असल्याचे सांगितले तसेच एका ुंजाबी संपादकांनी पांच कवितांचा पंजाबीत इनुवादकेला. दिल्ली दूरदर्शनवर एक कार्क्रम झाला तसेच तीन-चार आकाशवाणीवरही.
मग शोध सुरू झाला तो प्रकाशनासाठी कांय करावे याचा. पण तत्पूर्वी हिंदीतील कांगी प्रथितयश कवींबरोबर चर्चा करावी असे वाटले.
मग माझ्या ओळखीतील तीन कवींबरोबर कविता-वाचनाचा कार्यक्रन झालादिनेश शुक्ल व केदारनाथ सिंह यांनी कांही बदल सुचवून अनुवादाला समृद्ध केल.तर नामवरसिंह या समालोचकांनी उत्तम कविताव उत्तम अनुवाद जमल्याचे सांगितले.
य दरम्यान प्काशकाचा शोध सुरूहोताच. आधी बिरला फाउंडेशन-- तिथे गााडी पुढे गेली नाही पण त्यांनीच आधीही एकदा कांही अनुवाद होऊन पुस्तक छापले गेल्याचे सांगत चक्क पुस्तकच हातांत ठेवल. ते चंद्रकांत बांदिवडेकर व तीन इतर मिळून केलेले अनुवाद होते -- इसी माटीसे या नांवाने.सुदैवाने मी निवडलेल्या कविता अगदी वेगल्या निघाल्या -- चार-सहा वगळता. मग हिंदी साहित्य-अकादनी व ज्ञाानपीठ दोन्हीकडे प्रयत्न करून त्यांना फार उशीर लागतो हे लक्षांत आले. मग आलोकपर्व प्रकाशन यांनी पुस्तक छापलत्या आधी कॉण्टिनेंटल व प़प्युलर प्रकाशनाची परवानगी पण घेतली कारण पुस्तकांचे हक्क त्यांचे होते.
तेव्हा दिल्लीत राम नाईक व मनोहर जोशी हे दोन मराठी मंत्री होते. त्यांना पुस्तक भेट देतांना नाइक यांनी विचारलं -- मग प्रकाशन समारंभ कधी करता आहात. मनांत म्हटलं हे छान प्रमुख अतिथी आपोआप मिळून गेले. अशा रितीने प्रकाशन समारंभही झाला, तेंव्हा नाझे एक मराठी सहकारी महेंद्र यांनी आवर्जून एक वेबसाईटही बनवली होती, आणि कांही कवितांचं साचन रेक़र्ड करून कॅसेटही काढली होती.
अशा तप्रकारे कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी अनुवाद माझ्याकडून घडून गेला व आनंदलोक या नांवाने पुस्तकरूपाने आला. हे सगळं जणू गांही गोणीतरी माझ्याकडून करवून घेतलं असच मला अजूनही वाटत रहातं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments: